HW News Marathi
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली । रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आजपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र करार होणार असल्याची माहिती मिळत आहे. या करारासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार ५अब्ज डॉलरचा असणार आहे. पुतीन हे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे.

भारताने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत-रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची ही भारतभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ साली मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेसाठी रशिया भारताला प्रशिक्षण देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौ-यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भात पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातअधिकृत चर्चा करणार आहेत, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्येदेखील रशियाचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पवारांच्या बंगल्यावर भाजप ‘जय श्रीराम’चे ५० हजार पोस्टकार्ड पाठवणार

News Desk

काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! – संजय राऊत

Aprna

द्रौपदी मुर्मू: भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींबद्दल माहित नसलेल्या घटना

News Desk
देश / विदेश

कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’ करणार फेब्रुवारीत अंतिम सुनावणी 

swarit

नवी दिल्ली |भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. जाधव यांच्यावर पाकिस्ताने हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. जाधव यांनी इराण मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानाच्या दाव्यानुसार जाधव यांना मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आले होते. परंतु भारताने पाकचे सर्व दावे फेटाळून लावले असून पाकने जाधव यांचे इराण मधून अपहरण कले असल्याचा दावा भारताने केला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीचा आरोप करत जाधव यांना गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन ‘आयसीजे’ने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. परंतु जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पुन्हा एकदा १८ फेब्रुवारी २०१९ पासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.

कुलभूषण यांची आयसीजेमध्ये अशी असणार सुनावणी

ही सुनावणी १८ ते २१ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कुलभूषण जाधव यांची सुनावणी आयसीजेमध्ये होणार आहे. सुनावणीच्या पहिल्या फेरीत १८ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत भारत आपली बाजू मांडणार आहे. तर १९ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत २० फेब्रुवारीला दुपारी ३ ते ४.३० पर्यंत भारताला आणि पाकिस्तानला सुद्धा २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत त्यांची बाजू मांडण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

Related posts

निर्मला सीतारमण यांनी बजेटमधील शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवली

swarit

महाराष्ट्रातील दोन बालकांना यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

swarit

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk