HW News Marathi
देश / विदेश

बिष्णोई समाजामुळे सलमानला ५ वर्षाची शिक्षा

जोधपूर | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर सत्र न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा आणि १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या २० वर्षापासून रखडलेल्या काळवीट शिकार प्रकरणीचा निकाल लागला आहे. या प्रकरणात सैफ आली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सलमानला शिक्षा होण्यासाठी राज्यस्थानमधील बिष्णोई समाजाने महात्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

बिष्णोई समाज नेमका आहे तरी कोण?

बिष्णोई समाजाने सतत पाठपुरावा केल्यामुळे काळवीट शिकार प्रकरणाचा सलमानला ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हा समाज राजस्थानच्या वाळवंट परिसरात आढळतात. या बिष्णोई समाजाला निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी ओळखले जाते. या समाजातील लोक प्राण्यांना देव मानतात. बिष्णोई समाज २९ नियमांचे पालन करत असून बिष्णोई शब्द २० म्हणजे बीस आणि नोई म्हणजे ९ यापासून तयार झाला आहे.

बिष्णोई समाजातील महिला जंगली जनावरांचे पालन-पोषण करतात. त्यांना आपल्यामुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. या समाजातील लोक जाती-धर्मावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक त्यांचा स्वीकार करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार ?

swarit

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

नीरज चोप्राची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेली!

News Desk