HW News Marathi
देश / विदेश

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

नवी दिल्ली | “मी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेऊन निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही. याची खंत वाटते”, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला होता. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांनी जरी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरीही राहुल गांधी मात्र आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ जून) त्यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा स्पष्ट केले. मात्र, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरीही आपण पक्षात सक्रिय भूमिका निभावणार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.”मी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्री, महासचिवांना आणि वरिष्ठ नेत्यांना पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही, याची खंत वाटते”, असेही राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काबुलवरून निघालेलं विमान भारतात सुखरूप पोहोचलं!

News Desk

धनंजय मुडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हात उंचावून मानले सर्वांचे आभार !

Arati More

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna