HW News Marathi
Covid-19

सीरम-भारत बायोटेक मधला ‘लसी’चा वाद मिटला

मुंबई | देशात ज्या दोन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या प्रमुखांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. पुण्याची सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी भारत आणि जगात लस प्रभावी आणि सुरक्षितपणे देण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.

या लसीवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ दीर पूनावाला आणि भारत बायोटेकचे एमडी डॉ कृष्णा इल्ला यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, आज जगाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लस आवश्यक आहे. या दोन्ही कंपन्या सुरक्षित आणि परिणामकारक लस लोकांपर्यंत पोहचवतील याची खात्री आहे. त्यासाठी उच्च प्रतीची पुरवठा व वितरण करण्याची तयारी चालू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिशय उत्तम निर्णय ! सरकारच्या ‘विकेंड लॉकडाऊन’च्या निर्णयाला भाजपचाही पाठिंबा

News Desk

मोदींच्या पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजार उंचावला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली बैठक, लॉकडाऊन की कडक निर्बंध?

News Desk