HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! भारतीय बँकाच्या घोटाळ्यात ७२ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये देशातील बँकांमध्ये तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आरबीआयच्या नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून समोर येत आहे. हा घोटाळा भारतीय बँकांमधील विक्रमी घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी केलेल्या पीएनबी घोटाळ्यामुळे तब्बल १३००० कोटींचा अपहार झाल्याचे आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात सादर केलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षात झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक घोटाळे ५० कोटींपेक्षाही जास्त रकमेचे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत घोटाळ्यात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढ

आरबीआयच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये फसवणूकदारांमुळे भारतीय बँकांमध्ये तब्बल ४१,१६७.७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे कडक देखरेख आणि दक्षता घेऊनही मागील वर्षाच्या (२०१६-१७) तुलनेत भारतीय बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सायबरशी संबंधित घोटाळ्यांचे प्रमाण सर्वाधिक

आर्थिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये ऑफ बॅलेन्स शीट ऑपरेशन्स, परकीय चलन व्यवहार, बचत खाते आणि सायबरशी संबंधित घोटाळे केंद्रस्थानी आहेत. या संपूर्ण आर्थिक वर्षात बँकिंग व्यवहारात झालेल्या सायबर फसवणुकीची संख्या मोठी आहे. या वर्षात झालेल्या तब्बल २०५९ इतक्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमुळे १०९.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी १,३७२ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमुळे ४२.३ कोटी रुपयांचा नुकसान झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छत्रपती आणि ठाकरे घराण्यातील ते नातं आजही ! राज ठाकरेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

News Desk

श्रीनगरमधील पोलीस चौकीत दहशतवादी हल्ला

News Desk

न्यायाधीश एस. मुरलीधर काँग्रेसचे निकटवर्तीय असलेली ‘ती’ व्हायरल पोस्ट खोटी

swarit
देश / विदेश

सज्जन कुमार अखेर शरण

News Desk

नवी दिल्ली | दिल्ली उच्च न्यायालयाकडून १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील आरोपी सज्जन कुमारला १७ डिसेंबर रोजी जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालायने सज्जन कुमारला जन्मठेपची शिक्षा सुनावत ३१ डिसेंबर रोजी शरण येण्याचा आदेश दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार सज्जन कुमार आज (३१ डिसेंबर) कडकडडूमा न्यायालयात शरण आले आहेत.

सज्जन कुमारवर १९८४ साली झालेल्या शीख दंगलीदरम्यान दिल्लीतील जमावाच्या भावना भडकविल्याचा आरोप आहे. या जमावाने ५ शिखांची हत्या केली होती. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचा आदेश दिल्यानंतर शरण येण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून मिळावी यासाठी सज्जन कुमारने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सज्जन कुमारची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येणार आहे. तेथे सज्जन कुमारला तुरुंग क्रमांक २ मध्ये ठेवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

News Desk

पुतीन यांनी युक्रेनमधील दोन प्रांतांना दिली ‘राष्ट्र’ची मान्यता; रशिया-युक्रेन युद्ध होणार?

Aprna

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk