HW News Marathi
देश / विदेश

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

नवी दिल्ली | “आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे. ते उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बोलत होते. “काश्मीरमध्ये दर २ ते ३ दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबविणे हे माझे काम आहे”, असेही मोदी यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज (१२ मे) सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला आहे. “काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे आज सकाळीच समजले. यावरून काही लोक असा प्रश्न विचारात आहेत की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारले ? मग आता दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरपीएफ जवानाने लहान मुलाचे प्राण वाचवले

swarit

आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा होणार

News Desk

“…सर्व समर्थक उड्या मारत होते”, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीका

Aprna