HW News Marathi
देश / विदेश

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राईकनंतर देशाचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे ? पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख कसा आहे ? हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज-सी वोटर्सने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेदरम्यान ५० हजार ७४० लोकांशी संवाद साधण्यात आला आहे.

एबीपी न्यूज-सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ५० %झाली होती. भारतीय वायू दलाकडून २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ५ टक्क्यांनी वाढून ५५ % इतकी झाली आहे. तर ७ मार्चला मोदींची लोकप्रियता ६२% झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

एबीपी न्यूज-सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार, २०१५ साली पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ६० % होती. २०१६ साली याचे प्रमाण वाढून ६२ % इतके झाले तर २०१७ मध्ये ते प्रमाण ६६% इतके झाले. या सर्व्हेनुसार, जानेवारी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होऊन ६३ % इतकी झाली, त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये तर ती ५४ % वर घसरली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल गांधी यांना पाकिस्तानला मदत करायची आहे | रविशंकर प्रसाद

swarit

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk

फडणवीसांकडून शाहू महाराजांचा ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा उल्लेख, नेटिझन्स संतापले

News Desk
देश / विदेश

नीरव मोदी लंडनमध्ये, घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास दिला स्पष्ट नकार

News Desk

नवी दिल्ली | पीएनबी बँकेला करोडोंचा चुना लावून परदेशात पसार झालेला नीरव मोदी सध्या लंडनमध्ये राहत आहेत. ‘द टेलिग्राफ’ च्या एका पत्रकाराने नीरव मोदीला लंडनच्या रस्त्यावर फिरताना पाहिले. त्यानंतर या पत्रकाने नीरव मोदीला घोटाळ्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच्या कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्यात नीरव मोदीने नकार दिला. या पत्रकाराने अनेकदा नीरव मोदीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ‘सॉरी नो कॉमेंट्स’ असे म्हणत नीरव मोदीने उत्तरे देण्यास टाळले.

फरार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबी बँकेला तब्बल १३,००० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. नीरव मोदीचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्र किनारी असलेला अलिशान बंगला काल (८ मार्च) सकाळी ९ वाजातच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. नीरव मोदीचा हा बंगला पाडण्यासाठी १०० डायनामाइट्स वापरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात २५ जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले कि, नीरव मोदीचा बंगला मजबूत असून तो उद्ध्वस्त करणे शक्य नाही. त्यामुळे डायनामाइट्सच्या साहाय्याने स्फोट घडवून हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला.

Related posts

…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता !, फडणवीसांचा टोला

News Desk

नीरव मोदी ब्रिटनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली माहिती

swarit

पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो, सामनातून टीका

swarit