HW News Marathi
देश / विदेश

सर न्यायाधीश मिश्रांची होणार उचलबांगडी ?

नवी दिल्ली | दिपक मिश्रा यांना पदावरुन दूर करण्यासाठी विरोधकांकडून हालचाल होताना पहायला मिळत आहे. दिपक मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असून न्यायमूर्ती लोया प्रकरणात हि केस सीबीआयकडे देण्यात यावी ही याचिका त्यांनी फेटाळली होती. सध्या मिश्रांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली विरोधकांनी सुरु केल्या आहेत. या संदर्भात काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद शुक्रवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत.

मिश्रांना पदावरून हटविण्यासाठी पक्षांचे नेते आग्रही आहेत. त्यांना पदावरुन हटविण्यासाठी राज्यसभेच्या 67 खासदारांची स्वाक्षरी असलेले पत्र नायडू यांच्याकडे शुक्रवारी देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करुन यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा निकाल दिला. त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेतीस ‘सॅड लेटर डे’ असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला मागणी आली नाही – पीयुष गोयल

News Desk

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान

News Desk

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk
राजकारण

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk

मुंबई | न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा काँग्रेस पक्षाला रोखता येत नसल्यामुळे राहुल गांधीसह त्यांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटवत असल्याचा आरोप दाणवे यांनी केला. जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही आणि भाजपही विकासाच्या मुद्द्यावरून दूर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती . तसेच राहुल गांधी यांनी दीडशे खासदारांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राहुल गांधींनी या विषयात घाणेरडे राजकारण केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बदनामीचे कारस्थान केल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Related posts

“एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला…,” नारायण राणेंचे सूचक वक्तव्य

Aprna

‘भीक’ शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो! – चंद्रकांत पाटील

Aprna

यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय ?

News Desk