HW News Marathi
देश / विदेश

श्रीलंकेत आज ८७ बॉम्ब हस्तगत, मध्यरात्रीपासून लागू होणार आणीबाणी

कोलंबो | श्रीलंकेत आज दिवसभरात ८७ बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील चर्चमध्ये बॉम्बनिकामी करताना बॉम्बस्फोट झाला आहे. श्रीलंकेत आज (२२ एप्रिल) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू होणार आहे. श्रीलंकेत रविवारी (२१ एप्रिल) ईस्टर संडेच्या दिवशी ८ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याने जगभरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर देशात भिती आणि दहशतीचे वातावरण आहे. श्रीलंकेची सध्याची परिस्थिती पाहता, राष्ट्रपीत मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.

श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोटघडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात २९० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये ३५ हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले. रविवारी सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची झाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला २ वर्ष मुदतवाढ द्यावी, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

News Desk

शरद पवार यांनी कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी !

News Desk

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार 

News Desk