HW News Marathi
देश / विदेश

कथुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी पठाणकोट कोर्टाकडे

नवी दिल्ली | संपूर्ण देशाला ढवळून काढणाऱ्या कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे सोपविला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी हा निकाल दिला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी हा खटला चंदीगड कोर्टात हलवण्याची मागणी केली होती. तसेच आरोपींनीही याचिका दाखल करुन हा खटला पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे.

हा खटला पठाणकोट कोर्टात सोपवण्यापूर्वी कोर्टाने उधमपूर, जम्मू, रामबनसह अनेक जागांचा विचार केला होता. पण पीडितेचे कुटुंबीय रामबनशिवाय इतर जागेसाठी तयार नव्हते. पठाणकोट कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जम्मू-काश्मीर सरकारला सरकारी वकील नियुक्त करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला, वकिलांना आणि पुराव्यांना संरक्षण पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतीय जवानांवर आझम यांचे अप्रत्यक्ष गंभीर आरोप

News Desk

अरुण जेटलींच्या कुटुंबियांचे मोदींनी केले सांत्वन

News Desk

नौदलाच्या पश्चिम विभागाचा नौदल अलंकरण समारंभ – 2022 मुंबईत संपन्न

News Desk
महाराष्ट्र

मेट्रो रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे लातूरमध्ये भूमीपूजन

News Desk

लातुर | मेट्र रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे आज लातूरमध्ये भुमपुजन होणार आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्यात मोठा रोजगार उपलब्द होणार आहे. लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे संध्याकाळी पाचवाजता रेल्वे मंत्री पियुष्य गोयल मुख्यंमंत्री देवेंद्र फडवीस उपस्थीतीत भूमीपूजन सोहळा होणार आहे.

रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

Related posts

एकनाथ शिंदेनी आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत केला सण साजरा!

News Desk

विलासरावांनी महाराष्ट्रातल्या दूधाचा प्रश्न अमेरिकेतुन सोडवला होता !

News Desk

जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय? जाणून घ्या…

swarit