HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

मुंबई | महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज (२८ जानेवारी) अखेर सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदाराचे निलंबन रद्द केल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना विधानसभेच्या अध्यक्षासमोरचा माइक खेचणे व राजदंड उचलणे, तसेच विधानसभा तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळे गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या भाजपच्या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. 

भाजपच्या १२ निलंबित आमदारांची नावे

१) आशिष शेलार,

२) अभिमन्यू पवार,

३) गिरीश महाजन,

४) अतुल भातखळकर,

५) संजय कुटे,

६) हरीश पिंपळी,

७) पराग अळवणी,

८) राम सातपुते,

९) जयकुमार रावल,

१०) योगेश सागर,

११) नारायण कुचे,

१२) कीर्तिकुमार भांगडिया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

Arati More

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk

नीरव मोदीचा भारतात परतण्यास नकार

News Desk