HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला प्रकरणी पुर्नविचार याचिका राखून ठेवली

नवी दिल्ली | केरळ येथील शबरीमालाच्या अयप्पा मंदिरात सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुर्नविचार आज (६ फेब्रुवारी) सुनावणी दरम्यान हा निर्णय राखून ठेवला आहे. पुर्नविचार याचिकेवर सुनावणी दरम्यान त्रावणकोर देवास्वोम बोर्डने (टीडीबी) म्हटले की, सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याचा अधिकार मिळायला हवा असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा बोर्ड सन्मान करण्याच निर्णय केला आहे. बोर्डचे वकिल आणि वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी यांनी म्हटले की, संविधानाने नागरिकांना धर्माचा सन्मान करण्याचा अधिकार दिला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन, ए. एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड आणि इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. सुनावणी सुरु झाल्‍यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी, शबरीमला संदर्भात ६४ याचिका दाखल झाल्या असल्‍याचे सांगितले. यातील काही पुनर्विचार याचिका होत्‍या तर काही ट्रांसफर याचिका आहेत.

२ जानेवारीला पहाटे शबरीमाला मंदिरात बिंदू व कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी पोलिसांच्या बंदोबस्तात प्रवेश केला, आणि शेकडो वर्षांची परंपरा मोडली. या दोन्ही महिलांच्या प्रवेशावरून राजकारण पेटले होते. यानंतर १२ फेब्रुवारीला शबरीमाल मंदिरात महिलांना प्रवेशच्या पुर्नयाचिकेवर सुनवाण होणार आगे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहुमत न मिळाल्यास भाजपाला बसपा ने पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

News Desk

कोरोनामूळे ऑलिम्पिक स्पर्धेबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

swarit

मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात केले दाखल

swarit