HW News Marathi
देश / विदेश

आयोध्या प्रकरणावर २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार सुणावणी

नवी दिल्ली | अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची संबंधित १९९४च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दोनास एक असा हा निकाल दिला. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे, हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे जाणार नसल्याने रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळाच झाला आहे असेच म्हणावे लागेल.

२९ ऑक्टोबर २०१८ पासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात नियमितपणे होणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’मुळे भारताची मान उंचावली । दत्तात्रय भरणे

News Desk

भाजपा नेते अश्विनी उपाध्याय दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

News Desk

अंतिम परीक्षेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

News Desk