HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या आमंत्रणाला सुषमा स्वराज यांचा नकार  

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये २८ नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सुषमा स्वराज यांना निमंत्रित केले होते. सुषमा स्वराज यांनी शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. ‘करतारपूर साहिब कॉरिडोर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचे आभार मानते. मात्र करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन सोहळ्याला जाऊ शकत नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये २८ नोव्हेंबरला होणाऱ्या करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन सोहळ्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होणार नाहीत. या सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, देशाचे प्रतिनिधी म्हणून माझ्या सहकारी हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी उपस्थित राहतील, असेही त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला अस्मिता आहे हे दिसलं असतं!

News Desk

ममता बॅनर्जींनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

News Desk

दुर्दैवाने पक्षाने २ निष्ठावान युवा नेते गमावले – प्रिया दत्त

News Desk
राजकारण

#RamMandir : निवडणुकीच्या काळातच राम राम करतात, नंतर आराम करतात !

News Desk

नवी दिल्ली | निवडणुकीच्या काळातच राम राम करतात नंतर आराम करतात,’ अशा शब्दात शिवसेभा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला राम मंदिराच्या मुद्दावरून चांगलेच खडसावले आहे. पुढे ते असे देखील म्हटले की, सरकारने राम मंदिरावरून हिंदूंच्या भावनेशी खेळू नये, राम मंदिर नाही बांधले तर भविष्यात हे सरकारच राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

तसेच उद्धव ठाकऱ्यांचा अयोध्या दौर हा एक इव्हेंट असल्याची बोचरी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मी समस्त हिंदूंच्या भावना घेऊन येथे पोहोचलो असल्याचे उद्धव ठाकऱ्यांनी म्हटले आहे. अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज (२५ नोव्हेंबर)ला सकाळी राम जन्मभूमीत रामललांचे दर्शन घेतले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन हिंदीतून संवाद साधला.

उद्धव ठाकऱ्यांच्या पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे

  • निवडणुकीच्या काळातच राम राम करतात नंतर आराम करतात.
  • जर राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचाय तर निवडणुकीत यांचा मुद्द्याचा वापर करू नका.
  • मंदिर हे होणारच परंतु जर या सरकारने मंदिर नाही बांधले तर भविष्यात हे सरकार नाही बनणार नाही.
  • रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नव्हते, याच दुख वाटत होते.
  • सरकारनी अद्यादेश आणावा शिवसेना त्याला पाठींबा देईल.
  • रामाचे दर्शन घेतल्यानंतर चैतन्याची अनुभूती झाली
  • समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन अयोध्यादौरा
  • कोर्टाच्या हातात असेल तर राम मंदिराचे आश्वासन कशाला?
  • उद्धव ठाकरेंनी पोलीस प्रशासन, यूपी सरकार आणि नागरिकांचे आभार मानले.

Related posts

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

News Desk

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

सामान्य माणसावर पडणाऱ्या आर्थिक बोजाचे काय?

News Desk