HW News Marathi
देश / विदेश

देशातील ‘हे’ राज्य येत्या ७ एप्रिलपर्यंत होणार ‘कोरोना’मुक्त

हैदराबाद | संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ होऊन हजाराच्या पार गेली आहे. तर महाराष्ट्रा कोरोनाबाधितांचा आकडा २०० पार गेला आहे. यामुळे सध्या देशात भीती आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, देशातील तेलंगणा राज्य ७ एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त होईल, असा विश्वास तेलंगणाचे मुख्ममंत्री के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, चंद्रशेखर राव म्हणाले की, राज्यात २२ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत २५ हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. अनेक जणांची चाचणी केल्यानंतर ७० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ रुग्ण बरे झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी एखाद दोन रुग्ण वगळता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांनाही उपचारानंतर ७ एप्रिलपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०० पार

राज्यात मुंबईत १०, पुणे ५, अहमदनगर २, सांगली, बुलडाणा आणि जळगावमध्ये प्रत्येकी १ रुग्णांची भर पडला असून राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे. तर राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला, राहूल गांधींची बोचरी टिका

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना ४०-५० जागा लढवणार –  संजय राऊत

News Desk

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम, आदिवासींना माणूस समजत नाहीत – राहुल गांधी

News Desk