HW News Marathi
देश / विदेश

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

हैदराबाद एका महिलेने नववारी साडी नेसून तब्बल 42 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे. जयंती संपत कुमार असं या महिलेचं नाव आहे. हातमाग वस्त्रांचे प्रमोशन करण्यासाठी आणि महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो असल्याचे या महिलेने सांगितले. दरम्यान, जयंतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठीही अर्ज केला आहे. साडीसोबत त्यांनी शूज न घालता सँडल घातल्या होत्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक

News Desk

दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोड होणार

News Desk

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

सोनियांची प्रकृती खालावली

News Desk

मुन्ना मायकल पुन्हा अँक्शन, डान्सचा थरार

News Desk

झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk