HW News Marathi
देश / विदेश

आता बेटांचे ही नामांतर

मुंबई | अंदमानमधील तीन बेटांची नावे बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हॅवलॉक बेटाला यापुढील काळात स्वराज द्वीप, नील बेटाला शहीद द्वीप आणि रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट ही नवीन नावाने दिली जाणार आहे. तीन बेटांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच अंदमानमधील बेटांच्या नामांतराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमानला भेट दिली होती. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण होणार असून, यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. पोर्ट ब्लेअर येथील तत्कालीन जिमखाना मैदान अर्थात आताच्या नेताजी स्टेडियमवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावत अंदमान ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक आणि प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी, अंदमान-निकोबार बेटाचे शहीद आणि स्वराज बेट, असे नामांतरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुमारे महिनाभरापूर्वी पत्र लिहून केली होती. स्थानिक लोकांकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे नाव बदलण्याची मागणी होत असल्याचे बोस यांनी पत्रात म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk

पर्रिकर चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk

पंकजा मुंडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, उधाण

News Desk
देश / विदेश

आता शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्डाची सक्ती नाही

News Desk

नवी दिल्ली | मुलांना शाळेत प्रवेश घेताना कुठल्याही शैक्षणिक संस्थेने त्यांच्या पालकांकडे आधार कार्ड मागू नये. कारण शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलेले नाही. जर कुणी आधार कार्ड मागत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येईल,असा इशाराच ‘यूआयडीएआय’ अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे.

नवी दिल्लीत सध्या खासगी शाळांमध्ये नर्सरीसाठी दीड हजार मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे यूआयडीएआयने हा इशारा दिला आहे. अनेक शाळा मुलांना प्रवेश देताना आधार कार्ड सादर करण्याची सक्ती करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने हे स्पष्टीकरण दिले आहे. आधार कार्ड बँक खाते, मोबाईल सेवा किंवा शाळा प्रवेशासाठी सक्तीचे करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्येच स्पष्ट केले आहे.

 

Related posts

#AyodhyaRamMandir : माझ्या हृदयाजवळचं एक स्वप्न पूर्ण होतंय !

News Desk

उत्तर प्रदेश सामूहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk