HW News Marathi
देश / विदेश

आता बेटांचे ही नामांतर

मुंबई | अंदमानमधील तीन बेटांची नावे बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हॅवलॉक बेटाला यापुढील काळात स्वराज द्वीप, नील बेटाला शहीद द्वीप आणि रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट ही नवीन नावाने दिली जाणार आहे. तीन बेटांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच अंदमानमधील बेटांच्या नामांतराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमानला भेट दिली होती. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण होणार असून, यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. पोर्ट ब्लेअर येथील तत्कालीन जिमखाना मैदान अर्थात आताच्या नेताजी स्टेडियमवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावत अंदमान ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक आणि प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी, अंदमान-निकोबार बेटाचे शहीद आणि स्वराज बेट, असे नामांतरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुमारे महिनाभरापूर्वी पत्र लिहून केली होती. स्थानिक लोकांकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे नाव बदलण्याची मागणी होत असल्याचे बोस यांनी पत्रात म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्रिकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री

News Desk

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk

“फॅसिस्टविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे!” – ममता बॅनर्जी

News Desk