HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. त्यातच आज भाजपाच्या नेत्यांकडूनच दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईवर टीका करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण आहे, अशी टीका सुब्रमण्यम स्वामींनी सरकारवर केली आहे.

कायमस्वरुपी पेट्रोलचे कमाल दर ४८ रुपये प्रतिलीटर असायला हवेत. सरकारने पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा कमी करायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे वसूल करत असेल, तर ते जनतेचे शोषण आहे, असे स्वामी म्हणाले आहेत.

मंगळवारी ४ सप्टेंबरला पेट्रोल प्रति लिटर १६ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचलेले पहायला मिळत आहेत. या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला पडताना पहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

अटकपूर्व जामीन हवा असेल तर, केरळ पूरग्रस्तांना मदत करा | न्यायालय

swarit

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण

swarit