HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. त्यातच आज भाजपाच्या नेत्यांकडूनच दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईवर टीका करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण आहे, अशी टीका सुब्रमण्यम स्वामींनी सरकारवर केली आहे.

कायमस्वरुपी पेट्रोलचे कमाल दर ४८ रुपये प्रतिलीटर असायला हवेत. सरकारने पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा कमी करायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे वसूल करत असेल, तर ते जनतेचे शोषण आहे, असे स्वामी म्हणाले आहेत.

मंगळवारी ४ सप्टेंबरला पेट्रोल प्रति लिटर १६ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचलेले पहायला मिळत आहेत. या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला पडताना पहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरबीआय : रेपो रेटमध्ये २५ टक्के कपात, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त

News Desk

मुंबई विद्यापीठाला टॉप १०० मध्ये जागा नाही

News Desk

Goa Elections : मोठी बातमी! उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार

Aprna
राजकारण

भाजप आमदार राम कदमांचे बेताल वक्तव्य

News Desk

मुंबई | मुंबईत दहीहंडी सोहळ्यात उपस्थितांशी बोलताना भाजप आमदार राम कदम यांनी महिलांना उद्देशून चुकीचे वक्तव्य केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात ते चर्चेचा विषय ठरले आहेत. बोलण्याच्या ओघात राम कदमांचा स्वतःच्या जीभेवरील ताबा सुटलेला पहायला मिळाला. कोणतीही मुलगी तुम्हाला आवडली आणि ती नाही म्हणाली तर तुम्ही मला सांगा मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार, असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले आहे.

घाटकोपरच्या दहीहंडीत राम कदम उपस्थितांना आपला मोबाईल नंबर सांगत होते. गरज लागली तर कधीही फोन करा असे ते सांगत होते. यावेळी एक उदाहरण देताना राम कदम यांचा आपल्या जीभेवरचा ताबा सुटलेला पहायला मिळाले.

राम कदम यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हीडिओ ट्विट केले आहे. राज्यातील महिला कशा सुरक्षित राहणार?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा! – उद्धव ठाकरे

Aprna

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका

News Desk

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna