HW News Marathi
देश / विदेश

मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी

नवी दिल्ली | फेसबुक डेटा लीक प्रकरणी फेसबुकचा संस्थापक-अध्यक्ष मार्क झुकरबर्गच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आता मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. फेसबुक डेटाचोरी प्रकरण, त्यावरून झालेले आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंपनीतील चार बड्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे.

इलियोनिस, रोड आयलँड, पेन्सिवेनिया आणि स्टेट ट्रेझरर्स अँड न्यूयॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगर यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. याआधी २०१७ मध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. या प्रस्तावाला मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे समर्थन मिळेल, असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. असे असले तरीही सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झुकरबर्ग याच्याकडेच आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही भागीदारी ६० टक्के इतकी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk

अभिमानास्पद ! ‘चांद्रयान – २’ने आज केला चंद्राच्या कक्षेत प्रवेश

News Desk

मोदी मंत्रिमंडळातील नवं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठलं खातं?

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

News Desk

दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नारायण दत्त तिवारी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२५ ला झाला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्याचबरोबर जून १९८० ते जुलै १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.त्यानंतर ऑक्टोबर १९८० ते फेब्रुवारी १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री, अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून १९८५ ते ऑक्टोबर १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर १९८६ ते जुलै १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै १९८७ ते जून १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

Related posts

सीएए-एनआरसीविरोधातील रॅलीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला जामीन

News Desk

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

झारखंडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk