HW News Marathi
देश / विदेश

अनंतनागमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्म-ूकाश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सेकिपोरा परिसरात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराने सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सेकिपोरा परिसरात अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

श्रीनगरमधील लालचौक परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत जवळपास १० दहशतवादी उपस्थित होते. यानंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद ऊर्फ हनजल्लाने या भागातील सेल्फी देखील काढून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती. यापूर्वी सोमवारीदेखील जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात चकमकीदरम्यान जवानांनी चार दहशतवाद्यांना खात्मा घातले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्यप्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब

News Desk

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालय उद्या देणार मध्यस्थीबाबतचा निर्णय

News Desk

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

News Desk