HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार नसल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने घेतला आहे. कारण या दहशतवाद्यांच्या मोठ मोठ्या अंत्ययात्रा काढल्या जातात. आणि काश्मिरी तरुणांच्या मनात भारता बद्दल द्वेषाचे बीज पेरले जाते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेला आहे.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बूल मुजाहिदीन आणि अल बद्र या दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. काश्मीरमधील तरुणांना भारताविरोद्धात भडकविणे आणि त्यांना देशविरोधी कारवायात सामील करुन दहशदवादी बनविणे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ‘ऑल-आउट’ अंतर्गत दहशदवाद्यांना मारले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला नवीन दहशतवाद्यांची फळी तयार होत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे दहशतवादी संघटनाना मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा महाराष्ट्र दौरा, रायगडाला देणार भेट

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

Gauri Tilekar

सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदी नियुक्ती

swarit
राजकारण

छत्तीसगढमध्ये भाजपने केली जाहीरनाम्याची घोषणा

swarit

रायपूर । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने छत्तीसगढमध्ये जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने नवीन घोषणा केल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूरमधल्या एका हॉटेलमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने या जाहीरनाम्यामध्ये गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले आहे.

“नक्षलवाद्यांना क्रांतीचं माध्यम समजणारा पक्ष छत्तीसगडचं काहीही भलं करणार नाही. भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून छत्तीसगडमध्ये चौथ्यांदा सत्तेत येईल. आजारी राज्य असलेला छत्तीसगड आता वीज आणि सिमेंट उत्पादनाचं केंद्र झाला आहे”, असे शहा म्हणाले आहेत. काँग्रेस शेतक-यांना फक्त व्होट बँक समजते अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी टीका केली आहे. यावेळी भाजपध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच डॉ. रमण सिंह, कॅबिनेट मंत्री अमर अग्रवाल यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे

– आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास अंबिकापूर आणि जगदलपूरमध्ये मल्टि स्पेशालिटी रुग्णालय बनवणार

– स्मार्ट कार्ड धारकांना ५० हजारांहून १ लाख रुपये युनिर्व्हसल हेल्थ स्कीमअंतर्गत देण्यात येणार

– पत्रकार कल्याण बोर्डाची स्थापना केली जाईल

– छत्तीसगढमध्ये फिल्म सिटीचं निर्माण करणार

 

Related posts

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

लोकांनी लग्नात पेट्रोल, डिझेल आहेर म्हणून द्यावे | सचिन सावंत

News Desk

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk