HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपमुळे हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान

लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्यामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी टीका शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत. भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत.

कश्मीरमध्ये कलम ३७० संपले का ? तरुणांना रोजगार मिळाला का? पंतप्रधान मोदींनी दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले काय? अयोध्येत राम मंदिर झाले का? असे अनेक प्रश्न शंकराचार्यांनी या मुलाखती दरम्यान उपस्थित केले. आता भाजप शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

News Desk

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

News Desk

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk
देश / विदेश

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार

swarit

देहरादून: तुफान पावसामुळे उत्तराखंडमध्ये प्रचंड अर्थिक नुकसान झाले आहे. देहरादून च्या चमोली भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक दुकानांचे तसेच घरांचेही नुकसान झाले. अचानक झालेल्या तुफान पावसामुळे नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. पावसामुळे कर्णप्रयाग – ग्वालदम महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता.

अचानक झालेल्या या पावसाने उत्तर भारतात हाहाकार उडाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला असूनपंजाबमधील अमृतसर आणि राजस्थानमधील अलवरमध्ये पावसाने मोठे नुकसान झालं आहे.

या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. अमृतसर येथे काढणी झालेल्या पिकांसह धान्य देखील भिजले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. वादळी वा-यासह राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या पावसात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला असून काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्त आहे.

Related posts

“भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं बाबासाहेबांना देखील वाटलं नसेल”- हसन मुश्रीफ

News Desk

Independence Day 2022 : जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk