HW News Marathi
देश / विदेश

मिग-२७ विमान कोसळले, अपघाताच कारण अस्पष्ट 

जोधपूर | हवाई दलाचे मिग-२७ हे विमान राजस्थानमधील जोधपूर येथे कोसळले आहे. या विमान अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचे हे विमान कोसळले असल्याची माहिती मिळत आहे. विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर पडल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोशल मीडिया भाजपचे ऑक्सिजन, तर ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच !

swarit

शरण या अथवा मृत्यूस सामोरे जाण्यास तयार राहा, भारतीय लष्कराचा इशारा

News Desk

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk
राजकारण

फेसबुकचे १५ हजार लाइक्स मिळवून देणार विधानसभेचे तिकीट ?

News Desk

मध्यप्रदेश | आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सध्या सर्वच पक्षांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसकडून सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत केल्याचे पहायला मिळत आहे. या ठिकाणी गेली १५ वर्षे भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथविण्यासाठी काँग्रेसकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने निवडणुकीतील उमेदवारी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर सक्रीय असणे कार्यकर्त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या कार्यकर्त्यांचे फेसबुकवर १५ हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असतील अशाच कार्यकर्त्याला विधानसभेचे तिकीट देण्यात येईल, असे फर्मान मध्य प्रदेश काँग्रेसने समितीने काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कॉंग्रेसच्या वतीने इच्छुक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भात एक पत्रही पाठविण्यात आले आहे. इच्छुक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना 15 सप्टेंबरपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस्ऍपबाबतचा तपशील मध्य प्रदेश काँग्रेस समिती आणि आयटी विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता असून या वर्षअखेरीस राज्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाला हरविण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रीय रहाणे हे नेते मंडळींना कॉंग्रेसकडून बंधणकारक करण्यात आले आहे.

 

Related posts

देशभरात मोदींची त्सुनामी, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल !

News Desk

MarathaReservation : दोन्ही सभागृहात चर्चेविना एकमताने विधेयक मंजूर

News Desk

मुंबई कोस्टल रोडचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन

News Desk