HW News Marathi
देश / विदेश

संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईतून सुरुवात…

मुंबई | देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. आणि आज या संविधान सन्मान यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला मुंबईतून सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील चैत्यभूमी परिसरातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी निखिल वाघळे, उपस्थित होते. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश, नागपूर मार्गे आज मुंबईत दाखल झाली. या यात्रेदरम्यान शेतकरी, मजूर, कामगारांसह एकूणच नागरिकंच्या समस्या व त्यांच्या संविधानिक अधिकार व शासन ते कसे हिरावून घेत आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे.

संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होतांना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज आहे. यावेळी यात्रेत सहभगी झालेले माहुलग्रस्त नागरिक, घर बचाओ घर बनाओ आंदोलन कार्यकर्ते, आरे वसाहत इ. सहभागी झाले. सुनीती सुलभा रघुनाथ म्हणाल्या, सध्या संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवण्याचे कार्य सरकारला करायला हवे परंतु ते करीत नसल्याने आता लोकांनाच संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे लागले, म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. सध्या देशात समाजा-समजामध्य, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणाऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk

चीनला भिडण्यासाठी नौदलाची नवी पाणबुडी

News Desk

वुहानमध्ये पुन्हा कोरोचा रुग्णांमध्ये वाढ! वाढली देशवासीयांची चिंता

News Desk