HW News Marathi
देश / विदेश

सरकारने उचललेले पाऊल पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेल | मनमोहन सिंग

मुंबई | लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना एक पत्र लिहले आहे. “आपण इतिहासाच्या एका नाजूक वळणावर आहोत. सरकारने उचललेले पाऊल हे पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेल. आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोलावे,” असा सल्ला मनमोहन सिंह यांनी पत्राद्वारे मोदींना दिला आहे.

मनमोहन सिंह म्हटले, “सध्याच्या परिस्थितीत सरकारमधील सर्व घटकांनी संकटाचा सामना करण्यासाठी किंवा परिस्थिती आणखी चिघळणार नाही, यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पंतप्रधान आणि केंद्र सरकारने त्यांच्यासमोरील आव्हानांचा सामना करावा. आणि कर्नल संतोष बाबू आणि भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देऊ नका, ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पाकिस्तानसोबत पुढचा संवाद पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर !

News Desk

… म्हणून संपूर्ण देशाला दोषी ठरविणार का ? सॅम पित्रोडांकडून पाकिस्तानची पाठराखण

News Desk

बळजबरीने चुंबन घेणाऱ्याची जीभ छाटली

News Desk