HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 16 मार्चला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (2 मार्च) जवळपास 2 तास सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी ऑनलाईन हजेरी लावत युक्तीवाद केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न गेल्यावर हरीश साळवेंनी टीका केली. तसेच जर बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडीतील पक्षाने साथ सोडली असते. काही होऊ शकले असते? असा सवाल उपस्थित हरिश साळवेंनी करत टीका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर वकील नीरज कौल यांनी युक्तीवात केला. यानंतर हरीश साळवेंनी युक्तीवाद केला. यावेळी बहुमत चाचणीला गेले असेत तर शिंदे गटाने काय भूमिका घेतली असती हे आपण सांगू शकत नाही. जेव्हा शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले. तेव्हा महाविकास आघाडी सरकारचे समर्थनक असलेले 13 आमदार गैरहजर राहिले होते.

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलाविले होते. मात्र, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरे न जाता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता. राज्यपालांसमोर शिंदेंने बहुमत चाचणीला बोलविण्यासाठी पर्याय नव्हता. शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले आणि त्यांना बहुमत मिळवण्यात यश आले, असे हरिश साळवेंनी सर्वोच्चन न्यायालयात युक्तीवाद केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका, नियोजित पालघर दौरा रद्द!

News Desk

काँग्रेस १२ मेपासून करणार राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा

News Desk