HW News Marathi
देश / विदेश

अमित शहांच्या मुलांची संपत्ती १६ हजार पटींनी वाढली

नवी दिल्ली: भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या कंपनीच्या नफ्यात तब्बल १६ हजार पटींनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून शहा यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. हेच का ते अच्छे दिन म्हणत सोशल मीडियातून शहावर टीका होत आहे. न खॉउंगा न खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान यावर गप्प बसणार का असाही सवाल विरोधकांनी केला आहे. जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी ८०.०५ कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे.

टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे. मात्र, कंपनीच्या गेल्यावर्षीच्या उलाढालीवर नजर टाकल्यास यामध्ये तब्बल १६,००० पटींना वाढ झाली आहे. परंतु, या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही त्यांनी इतका उत्कर्ष कसा साधला, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताबदल झाल्यानंतर हे सर्व घडले आहे. यालाच भांडवलदारांची कंपूशाही म्हणतात. आता पंतप्रधान सीबीआयला या सगळ्याची चौकशी करायला सांगणार आहेत का? जय शहा यांना अटक होईल का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार का?, असेही सिब्बल यांनी विचारले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

News Desk

NEET  व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक ?

News Desk
महाराष्ट्र

जीएसटी रिटनसाठी तीन महिन्यांचा कालावधी

News Desk

छोटया व मध्यम व्यापा-यांकरीता जीएसटी अंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कॉन्सिल मध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जीएसटी अंतर्गत प्रत्येक व्यापा-याने प्रत्येक महिन्यात त्याच्या विक्री, खरेदीचा पूर्ण तपशिल तसेच तपशिलावर आधारित विवरणपत्र दाखल करणे करणे आवश्यक आहे. छोटया व मध्यम उलाढाल असलेल्या व्यापा-यांनी या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रत्येक महिन्यात सर्व तपशिल भरणे ही अधिक कालापव्यय करणारी व खर्चिक बाब आहे असे निवेदन देत आपली भूमिका विशद केली. व्यापारी बांधवांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिनिधींना जीएसटी अंतर्गत सर्व व्यापा-यांनी करासंदर्भात अनुपालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी छोटया व मध्यम व्यापा-यांचा जीएसटी अंतर्गत अनुपालन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याऐवजी त्रैमासिक विवरण भरण्याचे प्रावधान जीएसटी कायद्याअंतर्गत करावे अशी मागणी येत्या 6 ऑक्टोबर 2017 रोजी होणा-या वस्तू व सेवा कर परिषदेत करण्याची ग्वाही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

Related posts

महाराष्ट्रातील केंद्रातील मंत्र्यांनी मोदींच्या सहीचा २ हजार कोटींचा चेक घेऊन यावा!

News Desk

“…पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

संजय राऊत महाभारतातले त्यामुळे धृतराष्ट्राला दिसत नाही ते त्यांना दिसतं, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

News Desk