HW News Marathi
देश / विदेश

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली | आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ७५% मतदान सुनिश्चित करून निवडणूक लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी आज (२५ जानेवारी) निवडणूक आयोग आणि नागरिकांना केले तसेच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेण्यावर सहमती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिलेल्या संदेशात नायडू यांनी एकही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यावर भर दिला. तसेच निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मत द्यावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नायडू यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे ते हैदराबादमध्ये गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील कार्यक्रमात त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.

१९५१-५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या ४४.८७% मतदानावरून २०१९ मध्ये १७ व्या लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक ६७.४०% मतदानाची नोंद झाली, मतदानात ५०% वाढ झाल्याचा संदर्भ देत, यासाठी नायडू यांनी सर्व हितसंबंधितांची प्रशंसा केली. देशाच्या 70 वर्षांच्या निवडणूक प्रवासात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाने या संदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, लोकशाहीत प्रत्येक मतदाराला अभिमान वाटू शकेल, अशी विश्वासार्ह व उत्तरदायित्व निभावणारी आणि दूरदृष्टी असणारी संस्था अशी नायडू यांनी निवडणूक आयोगाची प्रशंसा केली.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत महिलांनी पुरुषांपेक्षा ०.१७% जास्त मतदान केले, ७० वर्षांमध्ये मतदानाच्या बाबतीत प्रथमच लिंग असामानते मधली दरी संपुष्टात आल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला. “आपल्या निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागात्मक बनवणे” या संकल्पनेवर १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी १९५० ला देश प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस अगोदर २५ जानेवारी १९५०. रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणून २५ जानेवारी हा दिवस ‘मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला !

News Desk

मोठ्या पडद्यावर, लवकरच येणार मीराबाई चानूच्या जीवनावर सिनेमा

News Desk