HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी सकाळी जनतेला ट्विटरवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १ मे हा महाराष्ट्रात राज्य स्थापनेचा दिवस आणि कामगार दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी, इम्रान खानकडून टीमचे अभिनंदन

News Desk
राजकारण

भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला- अशोक चव्हाण

News Desk

मुंबई : महाराष्ट्र दिना निमित्त पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला अशी टिका केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, आज महाराष्ट्र दिन आहे परंतु गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचा गौरव व्हावा असे कोणतेही धोरण भाजप शिवसेनेच्या सरकारने राबवले नाही. या सरकारच्या काळात कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी वर्गाला न्याय मिळताना दिसत नाही. उलट या सरकारमुळे राज्याची प्रगती न होता अधोगती होत आहे. महाराष्ट्र राज्याला या सरकारच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचेही चव्हाण यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

महाराष्ट्र ख-या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर गेला पाहीजे. शेतक-यांना ख-या अर्थाने न्याय मिळाला पाहीजे. महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी. तरुणांना नोक-या मिळाव्यात असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रापुढे आज उभे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान सरकार अपयशी ठरले त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत आहे असे म्हणत चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.

 

Related posts

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी पत्रकाराची नियुक्ती

Aprna

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk

देशाची अर्थव्यवस्था संकटात, नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

News Desk