HW News Marathi
राजकारण

भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला- अशोक चव्हाण

मुंबई : महाराष्ट्र दिना निमित्त पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला अशी टिका केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, आज महाराष्ट्र दिन आहे परंतु गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचा गौरव व्हावा असे कोणतेही धोरण भाजप शिवसेनेच्या सरकारने राबवले नाही. या सरकारच्या काळात कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी वर्गाला न्याय मिळताना दिसत नाही. उलट या सरकारमुळे राज्याची प्रगती न होता अधोगती होत आहे. महाराष्ट्र राज्याला या सरकारच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचेही चव्हाण यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

महाराष्ट्र ख-या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर गेला पाहीजे. शेतक-यांना ख-या अर्थाने न्याय मिळाला पाहीजे. महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी. तरुणांना नोक-या मिळाव्यात असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रापुढे आज उभे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान सरकार अपयशी ठरले त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत आहे असे म्हणत चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोदीमुक्त भारत’ करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची इच्छा !

News Desk

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Aprna

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

News Desk