HW News Marathi
देश / विदेश

…तर भाजप सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढला नसता !

नवी दिल्ली | “जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर भाजप सरकारने या राज्याचा विशेष दर्जा काढला नसता”, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पी.चिदंबरम बोलत होते. “जर भारतातील प्रसारमाध्यमे काश्मीरमध्ये असलेल्या अस्थिर परिस्थितीचे वृत्तांकन करत नसतील तर त्याचा अर्थ तिथली परिस्थिती स्थिर आहे असा होतो का ?”, असा सवाल पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

“जम्मू काश्मीर हे जर हिंदुबहुल राज्य असते तर भाजप सरकारने कलम ३७० रद्द करत त्याचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला नसता. तर जम्मू-काश्मीर हे मुस्लिमबहुल राज्य आहे म्हणूनच भाजप सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला”, असे विधान पी.चिदंबरम यांनी केले आहे. “जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर असल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडून सांगितले जात आहे. मात्र, भारतातील प्रसारमाध्यमे जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचे वृत्तांकन करताना दिसत नाहीत. मग जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमध्ये असलेल्या अस्थिर परिस्थितीचे वृत्तांकन करत नसतील तर तिथली परिस्थिती स्थिर आहे असा होतो का ?”, असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल, महाराष्ट्र सायबर सेलचा कडक इशारा

News Desk

गुगलचा जाहीर माफीनामा

News Desk

काश्मिरी अतिरेक्यांना मिळतो दुबई, इंग्लंडमधूनही पैसा

News Desk