HW News Marathi
Covid-19

देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही | आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासात १ हजार २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली असूनर देशभरात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या २१ हजार कोरोनाचे रुग्णांची संख्या असून देशात १६ हजार ६८९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत देशात ४ हजार ३२५ जणा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (२३ एप्रिल) नियमित पत्रकार परिषदेत दिली आहे.

देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या २८ दिवसात तब्बल १२ जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा ४ होता, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये सरकारने दिली या दुकानांना सूट

सरकारने लॉकडाऊनमध्ये काही शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रीपेड मोबाइल रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानेही सुरू राहतील. प्रत्येक राज्यातील ज्येष्ठ नागरिक काळजी घेण्याबद्दल माहिती दिली असून त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान फक्त ४ तासच झोपतात, मुख्यमंत्र्यांनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे

News Desk

कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी, मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारलं

News Desk

माणगाव एमआयडसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक, हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

News Desk