HW News Marathi
Covid-19

देशातील ‘या’ राज्याने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन    

नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. मात्र, देशाचे रखडलेले आर्थिकचक्र लक्षात घेता अडीच ते ३ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अखेर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा सातत्याने वाढत जाणारा प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगाल राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टपर्यंत आठवड्यातील २ दिवस लॉकडाऊन कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

ऑगस्ट महिन्यापासून पश्चिम बंगालमध्ये आठवड्यातील २ दिवस कडक लॉकडाऊन असेल. म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये २, ५, ८, ९, १६, १७, २३, २४ आणि ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. या लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद राहतील. तर पेट्रोल पंप, शेतीविषयक मालवाहतूक, न्यायालये अशा काही गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, पिंपरी चिंचवडमध्ये ‘हॉटस्पॉट’ भागात नागरिक रस्त्यावर

News Desk

सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करूं’चा प्रयत्न फसला…

News Desk

अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्यात पळवला, विदर्भावर अन्याय केला !

News Desk