HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली | काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील बिनेर परिसरात आज (२३ जानेवारी) दुपारी सुरु झालेल्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. याआधी शोपियानमधील हेफ श्रीमल भागात मंगळवारी (२२ जानेवारी) सकाळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चारी शरीफ परिसरात सोमवारी (२१ जानेवारी) पहाटे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. भारतीय सुरक्षा दलाला बडगाम येथे काही दहशतवादी दडून राहिल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांदनी ‘निखळली’ | अभिनेत्री श्रीदेवीचे निधन

Adil

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक! – अशोक चव्हाण

News Desk

सौदीत दहा भारतीयांचा मृत्यू

News Desk