HW News Marathi
देश / विदेश

आज ‘ब्लडमून’ चंद्रग्रहण

मुंबई | चंद्र ग्रहण यंदा गुरू पौर्णिमेच्या दिवशी आल्याने ते खास ठरणार आहे. हे ग्रहण सुमारे 3 तास 55 मिनिटं चालणार आहे. यंदा गुरू पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण आहे. २७ जुलैच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी हे सुरू होईल. २८ जुलैच्या सकाळी ३ वाजून ५ मिनिटांनी चंद्रग्रहण संपणार आहे.

चंद्रग्रहणाचा सुतककाळ हा दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. २७ जुलै २०१८ ला होणारे चंद्रग्रहण भारत, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातून दिसणार आहे. ३१ जानेवारी २०१८ रोजी यंदाचे पहिले चंद्रग्रहण झाले. या प्रकाराला ‘ब्लडमून’ म्हणतात. ग्रहणादरम्यान सूतक हा एक महत्त्वाचा काळ समजला जातो. त्यानुसार सूर्यग्रहणात सूतक काळ हा १२ तास आधी तर चंद्रग्रहणात सुतककाळ ९ तास आधी सुरू होतो. धार्मिक मान्यतांनुसार, ग्रहणादरम्यानच्या सुतककाळात नकारात्मक उर्जा असते. या काळात अनेकजण शुभ काम करणं टाळतात.

ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटे एवढा जास्त असून खग्रास स्थितीचा काल १ तास ४३ मिनिटांचा असणार आहे. रात्री ११.५४ वाजता ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. उत्तररात्री २.४३ वाजता खग्रास स्थिती समाप्त होईल. आणि उत्तररात्री ३.४९ वाजता ग्रहण सुटेल. हे ग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया खंड, अंटार्टिका, रशियाचा काही भाग, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग येथून दिसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Republic Day | इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा

News Desk

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

Aprna

‘महिलांचा आदर ते प्रसारमाध्यमांना सल्ला’, तालिबानची पहिली पत्रकार परिषद

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit