HW News Marathi
देश / विदेश

ओडिशात ‘तितली’ चक्रीवादळामुळे ५७ जणांचा मृत्यू

भुवनेश्वर | ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (११ ऑक्टोबर)ला ‘तितली’ या चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळामुळे संपुर्ण परिसराला तडाखा बसला आहे. बंगालाच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याने तितली या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण धारण केले आहे. तितली या चक्रीवादळमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात तितली चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ओडिशा सरकारने राज्यात हाय अलर्ड जारी करण्यात आला असून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवसासाठी सुट्टी देण्यात आली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तितली या चक्रीवादळाच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

News Desk

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

News Desk

#PulwamaAttack : पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk