HW News Marathi
देश / विदेश

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

40 टक्क्यांहून अधिक सीटस् रिकाम्या , 3 महिन्यात पश्चिम रेल्वेस 29.91 कोटीचे आर्थिक नुकसान

मुंबई – मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च करण्यासाठी उत्सुक मोदी सरकारने सद्यस्थितीतील मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यांचा अभ्यास केला नसून मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्के तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वेने दिली आहे. या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेस 29.91 कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागल्याची धक्कादायक माहितीही यातून पुढे आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अश्या 3 महिन्याची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेचे मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनजीत सिंह यांनी अनिल गलगली याना 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली. यात मुंबई ते अहमदाबाद अश्या 30 मेल एक्सप्रेसने 4,41,795 प्रवाश्यानी प्रवास केला प्रत्यक्षात 7,35,630 सीट्स होत्या. एकूण महसूल रुपये 44,29,08,220 येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपये 30,16,24,623 महसूल प्राप्त झाला. त्यामुळे तब्बल 14,12,83,597 रपये इतके आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा असून 3,98,002 प्रवाश्यानी प्रवास केला असून प्रत्यक्षात 7,06,446 सीट्स होत्या. त्यातून तब्बल 15,78,54,489 इतके आर्थिक नुकसान रेल्वे प्रशासनाला सहन करावे लागले.

पश्चिम रेल्वेस रुपये 42,53,11,471 इतका महसूल अपेक्षित होता पण फक्त रुपये 26,74,56,982 इतकाच महसूल प्राप्त झाला. यात दुरोतों, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे. अहमदाबाद मंडळ अभियंतानी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली याना ही माहिती दिली आहे. दरम्यान अहमदाबादसाठी नवीन गाडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अहमदाबाद येथे जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही स्लीपर क्लास असून महाग तिकिटे असलेल्या गाड्यातील सीट्स शत प्रतिशत कधीच भरल्या जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार सोबत रेल्वे मंत्रालयाने या बाबीचा अभ्यास करण्याऐवजी बुलेट ट्रेन हा निवडलेला पर्याय सर्व सामान्य जनतेसाठी सोयीस्कर नाही असे गलगली यांनी स्पष्ट केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहुमत न मिळाल्यास भाजपाला बसपा ने पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

News Desk

‘… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली’- नवाब मलिक

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता धोक्यात, तर लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर!

News Desk