HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडता आले नाहीच

मुंबई । मोदी सरकारच्या या कार्यकाळातील संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी (१३ फेब्रुवारी) संपले आहे. या अधिवेशनात तिहेरी तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडता आलेच नाही. आता मोदी सरकार लोकसभा निवडणुकांपूर्वी या विधेकाचा वटहुकूम आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेची संमती मिळाली मात्र ते अद्याप राज्यसभेत मांडता आलेले नाही. या विधेयकासाठी मोदी सरकारने दोनदा वटहुकूम काढला. आता या वाटहुकुमाची मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच ३ जून पूर्वी संसदेचे अधिवेशन सुरू होऊन राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले, तरच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

तिहेरी तलाक विधेयकाप्रमाणेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देखील राज्यसभेत संमत होऊ शकलेले नाही. या विधेयकात ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत परदेशातून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध, पारसी, जैन शरणार्थींना देशाचे नागरिकत्व द्यावे, अशी तरतूद आहे. मात्र ईशान्येकडील सर्व राज्यांचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे. आसामा करारानुसार, १९७१ सालानंतर भारतात आलेल्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज झाले होते शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचे निधन

News Desk

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा! – अजित पवार

Aprna

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

News Desk