HW News Marathi
राजकारण

लोकसभेचे अधिवेशन संपताच सुरु झाली राजकीय आकडेमोड

नवी दिल्ली | १६ व्या लोकसभेचे अधिवेशन बुधवारी (१३ फेब्रुवारी) संपले. हे अधिवेशन संपताच आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देशातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधी महाआघाडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी विरोधी पक्षांकडून आपली सर्व ताकद पणाला लावली जात आहे. दिल्लीतील बैठकांची, गुप्त बैठकांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता यात विशेष लक्ष घालायला सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी त्यांची दोन वेळा भेट घेतली. लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते दिल्लीतच असल्याने विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ही योग्य संधी ठरली. या सर्व नेत्यांचे रात्रीचे जेवण देखील पवारांसोबतच झाले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला तसेच तृणमूलचे अनेक नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

News Desk

भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्तेपदाची जबाबदारी

swarit

“महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल”, शरद पवारांचा विश्वास

Aprna