HW News Marathi
देश / विदेश

संसदेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक सादर, विरोधकांचा गोंधळ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन १७ जूनपासून सुरू झाले आहे. संसदेत आज (२१ जून) तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत विधेयक मांडण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या विधेयकाला विरोध केला आहे. तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लिमांच्या हक्काचे संरक्षण केले जाईल. या महिलांना न्याय आणि सशक्तीकरण होईल, असे मत रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

रविशंकर पुढे असे देखील म्हणाले की, या कायद्याने पिडीत मुस्लिम महिलांना न्याय मिळाणार असल्याचे देखील ते म्हणाले. तिहेरी तलाक विधेयक मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी याला विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील पहिले अधिवेशन असणार आहे. मागील सरकारच्या काळात राज्यसभेत पुरेसे बहुमत नसल्याने विरोधी पक्षाकडून हे विधेयक रखडविण्यात आले.

याआधी डिसेंबर २०१७ मध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले होते. परंतु हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकले नव्हेत. यानंतर मोदी सरकारला यासाठी अध्यादेश काढावा लागला होता. अध्यादेश काढल्यानंतर सरकारला सहा महिन्यांच्या कालावधीत विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करावे लागते. मात्र सरकारला सहा महिन्यात विधेयक मंजूर करता न आल्याने पुन्हा एकदा लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली होती. मात्र मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत रखडले गेले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : कोणीही पाकिस्तानला धमकावू शकत नाही | पाकिस्तान

News Desk

पंधरा दिवसांत भारत- चीन युद्ध पेटणार

News Desk

मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे !

News Desk