HW News Marathi
देश / विदेश

ट्रम्प-जोंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची बहुप्रतीक्षित अशा भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ही भेट १२ जून रोजी सिंगापूर येथे होणार आहे. या दोघांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून या भेटीला दुजोरा दिला आहे..

गेल्या काही महिन्यापुर्वी किम अमेरिकेला युद्धाची धमकी देत होता. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये आतंरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा शाब्दिक युद्धे रंगली होती. ‘अत्यंत अनपेक्षित अशी किम जोंग उन यांची भेट होणार आहे. आम्ही सिंगापूरमध्ये १२ जूनला भेटणार आहोत. ही जागतिक स्तरावर शांतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भेट ठरणार आहे.’ ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट हॅडलवरुन ट्विट केले.

https://twitter.com/realDonaldTrump/status/994587349718847489

या आधी किम हे दक्षिण कोरियाच्या सीमेवर स्थित असलेल्या पीस हाऊसमध्ये दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची बैठक झाली होती. बैठकीनंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशामध्ये सकारात्मक चर्चेमुळे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला तणाव निवळण्यास मदत झाली आहे. दक्षिण कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील राष्ट्राध्यक्ष यांच्या भेटी ही ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले गेले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये, सेनेचा मोदींना टोमणा

News Desk

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला..

Arati More

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna
देश / विदेश

स्वतंत्र काश्मीर कधीच होणार नाही

News Desk

नवी दिल्ली | स्वतंत्र काश्मीर कधीच होणार नाही, हे सत्य काश्मिरी तरुणांना सांगण्याची गरज असल्याचे, असे भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देणाऱ्या तरुणांना ठणकाहून सांगितले आहे. तसेच तरुण दहशतवादाचा अवलंब करत असून काश्मीर मधील सध्याची परिस्थिती पाहून रावल यांनी चिंता व्यक्त करत विधान केले आहे. शस्त्र हातात घेऊन कधीही स्वतंत्र मिळणार नाही, असे देखील रावत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काश्मीरला स्वतंत्र मिळवण्यासाठी हातात बंदूक घेणे गरजेचे असल्याचे सांगून तरुणांना भडकविणाऱ्या त्यांना काहीच साध्य होणार नाही, भारतीय लष्कर अशा तरुणांसोबत दोन हात करायला तयार असल्याचे रावत यांनी सांगतले. भारतीय जवान नागरिकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांशी लढतात. नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी जवानांकडून घेतली जाते,’ असेही बिपीन रावत यांनी म्हटले.

Related posts

#DelhiAssemblyElections Live Updates : गांधी कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

swarit

भाजपमध्ये प्रवेश करणार नाही- सचिन पायलट

News Desk

‘कोरोना व्हायरस’च्या भितीने पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

swarit