HW News Marathi
देश / विदेश

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकासआघाडीत वितुष्ट ?जयंत पाटील म्हणतात…!

सांगली। महाराष्ट्रात फुटणाऱ्या लेटर बॅाम्बचा धमाका राजकीय वातावरण ढवळून टाकतो.आजही शिवसेनेचा आमदार प्रताप सरनाईक यांनी ९ जूनला उद्धव ठाकरेंना लिहीलेल पत्र मिडीयाला मिळालं आणि भाजप-शिवसेना युती होणार का ? याची चर्चा चालु झाली.नितेश राणेंनी याबाबत महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येतयं असं ट्विटही केलयं.चंद्रकात पाटील म्हणाले,आम्ही एवढे दिवस हेचं सांगत होतो.आता यावर शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

ईडीचे चक्र प्रताप सरनाईकांच्या मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नसणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल आहे . हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात कुजबुज सुरू झाल्याच चित्र आहे. त्यावर या पत्रामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट निर्माण होईल,असे मला वाटत नाही ,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे . पाटील म्हणाले की ” मला वाटत नाही की त्यांचा तो भाव असेल . शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत कुणी गेले नाही . असे आता काही झालेले नाही .अशापद्धतीने कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होईल असे मला वाटत नाही . ज्यांनी पत्र लिहिले आहे , त्यांच्या मतदारसंघात असे काही झाले का हे तपासून पाहावे लागेल , असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे .

प्रताप सरनाईकांनी पत्रात काय लिहीलं आहे ?

अवैध मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे . या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे . या पत्रात आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी अशी विनंती केली आहे . महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत आहेत . त्यामुळे भाजपशी युती करावी जेणे करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा ससोमिरा टाळता येईल ‘ असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील संचार बंदी हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

बीसीसीआयच्या दिल्ली कार्यालयाला कुलुप

News Desk

कोरोनासोबतच दिल्लीकर भुकंपाच्या धक्क्याने धास्तावले

News Desk