HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तामध्ये भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता

मुंबई | भारत आणि पाकिस्तामध्ये तणावाचे वातावरण असताना, पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने बेपत्ता झालेल्या दोन भारतीय अधिकाऱ्यांचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे. मात्र पाकिस्तानकडून अद्याप स्पष्टीकरण आले नाही.

सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही अधिकारी इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील दोन व्हिसा सहाय्यकांना ताब्यात घेतले होते. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गोपनीय माहितीची हेरगिरी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर भारताने या अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा जाहीर करत पाकिस्तानला पुन्हा पाठवले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित न करता आल्याचा दोष ‘काँग्रेस’वर

News Desk

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची २२ जुलैपासून ‘शेतकरी संसद’, जंतर-मंतरवरकरणार आंदोलन

News Desk

देशभरात इंधनांचे दर आज स्थिर, पेट्रोल शंभरीपार, तर डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत

News Desk