HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चारी शरीफ परिसरात आज (२१ जानेवारी) भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे सुरु झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय सुरक्षा दलाला बडगाम येथे काही दहशतवादी दडून राहिल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेरले. त्यानंतर परिसरात या शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

भारतीय सैन्याने गुरुवारी (१७ जानेवारी) जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली होती. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ५ जवानांना ठार केले तर पाकचे १२ बंकर्सही उध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आले. सर्जिकल स्ट्राईकनंतर ही भारतीय लष्कराने केलेली सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुढच्या ८ दिवसांत शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवणार, कर्नाटक सरकारचे आश्वासन

News Desk

#Article370Abolished : कलम ३७० हटविण्यासाठी ३७० मते

News Desk

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेस रोखू शकतो – पृथ्वीराज चव्हाण

News Desk