HW News Marathi
देश / विदेश

पुढच्या ८ दिवसांत शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवणार, कर्नाटक सरकारचे आश्वासन

मुंबई | कर्नाटकातील बेळगावामधील मनगुत्ती गावातून शुक्रवारी (७ ऑगस्ट) एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारानंतर शिवप्रेमींकडून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सरकारच्याच आदेशानुसार, संपूर्ण पोलीस बंदोबस्तात एका रात्रीत हा पुतळा हटविण्यात आला. दरम्यान, आता कर्नाटक सरकारकडून ८ दिवसात परवानगी देऊन शिवरायांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

“कर्नाटक सरकारने जर पुढच्या ८ दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी मनगुत्ती गावातील गावकरी शिवरायांचा पुतळा बसवतील”, असा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावमध्ये घडलेल्या या प्रकारच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये घडलेल्या प्रकारचे पडसाद हे राज्यभर प्रचंड तीव्रतेने उमटत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोणीही सेक्युलर नाही, ‘ती’ एक प्रकारची शिवी । संजय राऊत

Gauri Tilekar

पाईनच्या तागापासून मोदी जॅकेट

News Desk

माणसांचे मांस खाणारे नरभक्षक जोडपे अटक

News Desk