HW News Marathi
देश / विदेश

आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची अमानुषपणे हत्या

नवी दिल्ली | उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आसाममधील तिनसुकिया या शहरात ५ तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्फाच्या दहशतवाद्यांनी ६ जणांचे अपहरण केले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीवर नेऊन तेथे गोळ्या घातल्या. ज्यात ४ जणांचा जागीच तर एकाच रुग्णालयात जाताना मृत्यू झाला आहे. एका जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तिनसुकियामध्ये तरुणांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे. ‘हे सगळं एनसीआरमुळेच झालं असल्याची शंका देखील ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

swarit

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

swarit

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हिंदुस्थानी घटनेला तरी हुंदका फुटू द्या! – सामना

News Desk