HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांनी मोदींच्या विरुद्ध नाही तर श्रीरामांच्या विरोधात विधान केले – उमा भारती

नवी दिल्ली | अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी आज (२० जुलै) संताप व्यक्त करत शरद पवारांनी श्रीरामांच्या विरोधात विधान केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून कालच शरद पवार यांच्या या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला होता. मंदिर बांधून कोरोना बरा होत नाही, असे पवारांना सुचवायचे असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरला जाऊन कोरोना नष्ट कर, असे साकडे विठ्ठलाला का घातले? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवारांना विचारला होता. ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होणारं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव

Aprna

देशातील सर्वात जास्त लांबीच्या पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उदघाटन

News Desk