HW News Marathi
Covid-19

“नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज”, लसीकरणावर टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्याच आठवड्यात झाला. यावेळी मोदी सरकारमध्ये सामील झालेले आणि देशाच्या आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्विकारलेले मनसुख मांडवीय यांनी नुकतंच टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मांडवीय यांनी आपल्या ट्विटमधून आपली मतं मांडली आहेत. आपल्या या ट्विटमध्ये मांडवीय म्हणतात, भ्रम आणि चिंतेचं वातावरण पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. हे नेते शासनप्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींपासून इतके दूर आहेत की त्यांना लसीकरणाबद्दल जी माहिती दिली जाते, त्याबद्दलही काही कल्पना नाही.

ते पुढे म्हणाले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण व्हावं यासाठी जून महिन्यात ११.४६ कोटी डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आले तर जुलैमध्ये डोसची संख्या वाढवून १३.५० कोटी करण्यात आली. जुलैमध्ये राज्यांना किती डोस दिले जातील याची माहिती केंद्र सरकारने राज्यांना १९ जूनलाच दिली होती. त्यानंतर २७ जून आणि १३ जुलैला केंद्राने राज्यांना आधीच बरीचशी लसींबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे राज्यांना हे अगदी व्यवस्थित माहित आहे की त्यांना कधी किती डोस मिळणार आहेत.

कोणालाही काही अडचण येऊ नये यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आता जर केंद्र सरकारने आधीच राज्यांना लसीच्या उपलब्धतेबद्दलची माहिती दिली असेल आणि तरीही अयोग्य व्यवस्थापन आणि लस घेण्यासाठीच्या लांब रांगा अशा समस्या येत असतील तर त्याचं कारण स्पष्ट आहे. लसींच्या उपलब्धतेबाबत मला अनेक राज्यांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून पत्राद्वारे किंवा चर्चेतून माहिती मिळालेली आहे. त्या आधारावर सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. मात्र नेत्यांची अशी निरर्थक वक्तव्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केली जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीच्या परीक्षा रद्दच, मात्र बारावीच्या परीक्षा…! । वर्षा गायकवाड

News Desk

राज्यात काही दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नका, सरकार तुमची काळजी घेईल

News Desk

“कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना?, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

News Desk