HW News Marathi
महाराष्ट्र

संघ बदलाकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान

मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आपल्या बिंधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णयावरूनही त्यांनी आता आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले ,’परिवर्तन चांगलं आहे. पण संघ इतका का बदलतोय याचा विचार झाला पाहिजे, असं सांगतानाच संघाने स्वत:ला बदलायचं ठरवलं असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे’, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

असंख्य हिंदू आणि मुस्लिमांचे बळी गेले

हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये असलेले मतभेद आपल्याला नवीन नाहीत. संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेल्या निर्णयावर म्हटलं आहे की, ‘संघ इतकी वर्ष आपण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला. मतांसाठी आपण धार्मिक विभाजन आणि फाळणी करत आला. त्यात असंख्य हिंदू आणि मुस्लिमांचे बळी गेले. आता तर हे परिवर्तन होत असेल आणि त्यातून जर देशाच्या एकता आणि अखंडतेला बळ मिळत असेल तर संघ इतका का बदलतोय या संदर्भात विचार केला पाहिजे’.

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. येणाऱ्या निवडणुकांसाठी संघ दक्ष झालाय. आता मुस्लीम बहुल वस्त्यांमध्येही संघाच्या शाखा सुरु करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, प्रविण दरेकर यांचा पवारांना टोला

News Desk

मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk

“महाविकास आघाडी सरकार बहुजनांचे सरकार,” पडळकरांची राऊतांवर टीका

Aprna