HW News Marathi
देश / विदेश

विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबणीवर?

नवी दिल्ली | भारतातल्या १७ बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाला वेळ लागू शकतो. कारण त्याच्या प्रत्यार्पणाच्या मार्गात एक कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे जी सोडवल्याशिवाय मल्ल्याला भारतात आणणे शक्य होणार नाही. ही कायदेशीर अडचण सोडवल्यानंतरच विजय मल्ल्याला भारतात आणता येणे शक्य होणार आहे. भारताला ब्रिटिश उच्चायोगाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. ही अडचण नेमकी काय आहे हे मात्र गोपनीय असल्याचे ब्रिटिश उच्चायोगाने सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk

येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Adil

INX Media Case : पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

News Desk